शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदराची कोंडी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:51 IST

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने रविवारी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अखेर ऊसदराची कोंडी फुटली. ‘एफआरपी अधिक २०० रुपये’ असा तोडगा निघाला असून, विनाकपात एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल मिळणार आहे. उर्वरित १०० रुपये दोन महिन्यांनंतर देण्यावर एकमत झाले. त्यामुळे आज, सोमवारपासून कारखान्यांचा गळीत ...

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने रविवारी झालेल्या साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अखेर ऊसदराची कोंडी फुटली. ‘एफआरपी अधिक २०० रुपये’ असा तोडगा निघाला असून, विनाकपात एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल मिळणार आहे. उर्वरित १०० रुपये दोन महिन्यांनंतर देण्यावर एकमत झाले. त्यामुळे आज, सोमवारपासून कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.हा तोडगा मान्य करून तो कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित असला तरी इतर जिल्ह्यांनीही त्यानुसारच पहिली उचल द्यावी, असे आवाहन स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. शेट्टी यांनी प्रतिटन ३४०० रुपये, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी प्रतिटन ३५०० रुपये, तर ‘रयत’चे नेते व कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एफआरपी अधिक ३०० रुपयांची पहिली उचल मागितली होती. तिन्ही संघटनांनी यामध्ये लवचिकता दाखविली; पण चर्चेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा, असा पेच निर्माण झालाहोता.शनिवारी खासदार शेट्टी, प्रा. संजय मंडलिक व प्रकाश आवाडे यांची बैठकीच्या माध्यमातून तडजोडीचे पहिले पाऊल पडले. शेतकरी संघटनेची लवचिकता व कारखानदारांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली. बैठकीत निघालेला तोडगा मान्य नसल्याचे व आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचेरघुनाथदादा पाटील व अंकूश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी नंतर जाहीर केले.‘एफआरपी’ व ७० : ३० चे दोन कायदे असताना प्रत्येक वर्षी साखर कारखानदारांची अडवणूक योग्य नाही. गतवर्षी एफआरपी अधिक १७५ रुपयांवर तडजोड झाली असली तरी अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’पेक्षा ६०० रुपये जादा दिले आहेत. मग हंगामाच्या सुरुवातीलाच खोडा का घालता? अशी विचारणा आमदार हसन मुश्रीफ व विनय कोरे यांनी केली. यावर हरकत घेत कायद्याची भाषा आता बोलता; मग ‘एफआरपी’ देण्याची ताकद कारखान्यांकडे नव्हती त्यावेळी ‘८० : २०’ हा फॉर्म्युला कोणी आणला? त्यावेळी तुमचा कायदा कोठे गेला होता? आम्ही दोन पावले मागे घेऊन दर मान्य केला. आता साखरेचे दर चांगले असल्याने शेतकºयांना चार पैसे जादा मिळाले तर बिघडले कोठे? अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी केली. गुजरातमधील कारखाने ४४०० रुपये दर देऊ शकतात. मग तुम्हाला अशक्य का? असे रघुनाथदादा पाटील यांनी विचारले.गुजरातमधील सोळा कारखान्यांचे सोळा दर आहेत. ४४०० रुपये दर देणारा कारखाना सभासदांना किती दराने साखर देतो, किती गाळप होते, हे पाहणे गरजेचे असून, त्या कारखान्याने गतवर्षीच एवढा दर दिल्याचे ‘शाहू’चे व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे यांनी सांगितले.मागील दरात गफलत केल्याचा आरोप ‘अंकुश’ संघटनेने केला. यावर मागील कायद्याप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे, या हंगामावर चर्चा करा, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. मंत्री पाटील यांनी साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा करून एफआरपी अधिक २०० रुपयांवर तोडगा काढून ऊसदराची कोंडी फोडली.बैठकीस ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री व जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, कुंभी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, प्रा. संजय मंडलिक, के. पी. पाटील, अशोक चराटी, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विजय देवणे, राजीव आवळे, सुरेश पाटील, पी. जी. मेढे, आदींसह संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.पालकमंत्र्यांची शिष्टाई सफलगत हंगामातही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन बैठक बोलाविल्याने ऊसदरातून फारसा संघर्ष न होता तोडगा निघाला होता. यंदाही त्यांनीच पुढाकार घेऊन लाखो शेतकºयांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाची कोंडी फोडली. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे; परंतु आंदोलनामुळे तो ठप्प होता. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास हा तिढा सुटू शकतो, असे वृत्त ‘लोकमत’ने ३१ आॅक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

टॅग्स :agricultureशेती